Thursday, January 31, 2008

विदर्भात ११ शेतक-यांच्या आत्महत्या

विदर्भात ११ शेतक-यांच्या आत्महत्या
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2746292.cms
नागपूर - कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात गेल्या ४८ तासात ११ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात एकूण ४७ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. विदर्भात कृषीसंकटामुळे अनेक कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. २००६ साली पंतप्रधांनानी जाहीर केलेल्या तीन हजार कोटी रूपयांच्या पॅकेजमुळे शेतक-यांना फारसा लाभ झाला नसून आत्महत्या करणा-यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
राज्य सरकार एकीकडे शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीविषयीच्या प्रस्तावावर विचार करते. दुसरीकडे मात्र साहूकार आणि खाजगी बॅंकांची शेतक-यांकडून जबरदस्तीने कर्जवसूली सुरूच आहे. त्यामुळे राज्य सरकारने अशा कर्जवसूलीवर त्वरीत बंदी आणावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. १९९५ ते २००६ दरम्यान महाराष्ट्रात ३६,४२८ शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालय अंतर्गत येणा-या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात म्हटले आहे.
गेल्या ४८ तासाच विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतक-यांची नावे खालीलप्रमाणे. १) मुरलीधर शिरभाते २) सुनील अजनकर ३) सुरेश साबळे (वर्धा जिल्हा) , ४) दिगंबर शामसुंदर, ५) रुपराव आवारे ६) संतोष अडाम (अमरावती जिल्हा), ७) धोंडू खरात (गोंदिया जिल्हा), ८) प्रकाश इंगळे (बुलढाणा जिल्हा), ९) राम कहाकढे (यवतमाळ) १०) प्रभाकर करंजेकर (चंद्रपूर जिल्हा) ११) सदानंद फुरंगे अकोला

Wednesday, January 30, 2008

दहा लाखांच्या रुई गाठी खाक

दहा लाखांच्या रुई गाठी खाक
उमरखेड (जि.यवतमाळ), ता. ३० - आपला तालुका जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या आवारात ठेवलेल्या रुईच्या गठाणीला आज (ता. ३०) दुपारी लागलेल्या आगीत १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीत शंभर गाठी जळून खाक झाल्या.
गोळी झाडून पोलिस शिपायाने केली पत्नीची हत्या
गडचिरोली, ता. ३० - क्षुल्लक वादावरून संतप्त झालेल्या पोलिस शिपायाने आपल्या पत्नीची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना आज (ता.३०) संध्याकाळी पाचच्या सुमारास आनंदनगर येथे घडली. अलका संजय कोरडे(३०) असे मृत महिलेचे नाव असून, पती संजयला आरमोरी पोलिसांनी वघाळा या गावी नाट्यमयरीत्या अटक केली आहे. ......

Thursday, January 24, 2008

मंगळावर महिला सदृश्य जीव आढळला.


मंगळावर महिला सदृश्य जीव आढळला.


आशिष बडवे - २४ जानेवारी

पांढरकवडा (नागपुर) - जीवसृष्टीच्या नावाखाली नेहमीच चर्चेत राहिलेला पृथ्वीसदृश्य ग्रह मंगळावर नासाच्या यानाने महिला सदृश्य जीवाचे छायाचित्र टिपले आहे. त्यामुळे मंगळावर जिवसृष्टी असल्याच्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे. छायाचित्रातील तो जिव नग्नावस्थेतील महिलाच असल्याचा नासाचा दावा आहे द डेली मेल या वृत्तपत्राने दिले आहे. नासाच्या सहाय्याने तसे छायाचित्रही प्रकाशीत करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच मंगळ ग्रहावर बर्फाचे ढग आढळले होते. त्यामुळे आता मंगळ ग्रहाबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या ग्रहाचा व्यापक अभ्यास करण्याचा प्रयत्न नासा तर्फे केल्या जाणार आहे.


मंगळावर मानवाचे अस्तित्व


न्यूयॉर्क, ता. २३ - मंगळावर मानवाचे अस्तित्व असल्याचे दर्शविणारे छायाचित्र "नासा'ला पाठविण्यात आल्याने मंगळाचे गूढ अधिकच वाढले आहे. ......मंगळावरील एका टेकडीवर एक विवस्त्र महिला चालत असल्याचे छायाचित्र "नासा'ला पाठविण्यात आल्याचे वृत्त "डेली मेल'ने दिले आहे. या महिलेचे हात ताणलेले आहेत. याबाबत "नासा'ने अधिकृतपणे कोणतीही टिपण्णी केलेली नाही. या छायाचित्रात दिसणारी महिला खरी आहे की मंगळावरील एखादा दगड आहे यावर "नासा'ने काहीही सांगितले नाही. एका वेबसाईटच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे छायाचित्र पाहिल्यावर आमचा विश्वासच बसला नाही. विवस्त्र स्वरूपातील एक परजीव पाहून आम्हाला धक्‍का बसला, असे एका नागरिकाने या वेबसाईटला पाठविलेल्या मेलमध्ये म्हटले आहे. फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी काही दिवसांपूर्वीच मंगळावर कोरड्या बर्फाचे ढग असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हे वृत्त अधिकच गूढ निर्माण करणारे आहे. मंगळावरील बर्फाचे ढग काही वेळा इतके दाट होतात, की त्यामुळे मंगळावर गडद सावली पडते. मंगळावर कार्बन-डाय-ऑक्‍साईड असल्याचा पुरावा प्रथमच देणारे छायाचित्र या शास्त्रज्ञांनी दिले आहे.

Wednesday, January 23, 2008

बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


शुभेच्छुक - आशिष बडवे, पांढरकवडा
सौ सोनाली बडवे पांढरकवडा

Tuesday, January 22, 2008

शिवसेनाप्रमुख म्हणजे सूर्य!

सूर्य कधीही म्हातारा होत नाही. तो रोज उगवतो...रोज मावळतो. सूर्य आहे म्हणूनच आपण सगळे आहोत. शिवसेनाप्रमुखांचेही असेच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची आपल्याला आवश्यकता असून आतापर्यंत जसे ते मिळाले, तसेच ते पुढेही मिळत राहणार आहे, असे सांगत पुन्हा निवड झालेले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या निवृत्तीविषयी उठलेल्या वावड्यांना सोमवारी पूर्णविराम दिला. शिवसेनाभवन येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची फेरनिवड झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आणि शिवसैनिकांचे आभार मानले. 'गेल्या पाच वर्षांत अनेक संकटे आली. विरोधकही वाढले. मात्र, जनता आणि शिवसैनिकांच्या प्रेमाच्या पाठबळावर यातून बाहेर पडलो. हे प्रेम असेच कायम ठेवा. तुमच्या विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही', अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 'संघटना असेल तर दहा वेळेला सत्ता आणता येईल, पण संघटना नसेल तर काहीच नाही. त्यामुळे येथून पुढे फक्त संघटना, संघटना आणि संघटनाच,' असे ते म्हणाले.
राज्यातील निवडणुकांबाबत प्रश्ान् विचारता ते म्हणाले, निवडणुका व्हायच्या त्या होतच असतात. जनतेला कोण विचारतो? आम्ही मात्र महाराष्ट्राच्या भल्यासाठी नेहमी आंदोलनाच्या पवित्र्यात असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून रान उठविण्यासाठी आम्ही मेळावे घेतले. युएलसीविरोधात आंदोलन केले. जनतेच्या प्रत्येक प्रश्ानसाठी शिवसेना रस्त्यावर उतरते. याचा अर्थ शिवसेना जनतेसोबत आहे. सरकारच्याविरोधात आम्ही असेच आग लावत जाणार आहोत, असेही ते म्हणाले. मराठी माणसांचे प्रश्ान् मांडण्यात आणखी एक वाटेकरी निर्माण झाल्याचा प्रश्ान् विचारला असता मनसेचा उल्लेख न करता उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसासाठी शिवसेनेने नेहमीच लढा दिला असून शिवसेनेसोबत मराठी माणूस काल, आज होता आणि उद्याही राहील. मात्र, हे वाटेकरी व त्यांची वाटमारी पुढे टिकणार नाहीत. तत्पूवीर् शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले, या बैठकीत महिलांविरोधात अत्याचार वाढल्याबद्दल, यूएलसी रद्द करून मराठी माणसाला मुंबईबाहेर फेकल्याबद्दल, मुस्लिमांचे लांगूलचालन केल्याबद्दल निषेधाचा तसेच कामगारहित आणि कर्जमुक्तीसाठी संघर्ष करण्याचा ठराव संमत करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांचे मार्गदर्शन आजपर्यंत जसे मिळाले, तसेच ते कायम मिळावे आणि त्यांनी यापुढेही शिवसेनेचे नेतृत्व करावे, असा ठरावही सर्वानुमते मांडल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड अधिक शिरोडकर यांनी काम पाहिले. बूट घाला जाडजूड! कार्याध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सुचवले. पाच वर्षांपूवीर्च्या बैठकीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवले होते. तो धागा पकडत उद्धव, जोशी यांना म्हणाले, तुम्ही जाडजूड बूट घाला, नाही तर तुम्हालाही पायावर धोंडा मारून घेतला, असे म्हणण्याची वेळ येईल. (उद्धव यांचे नाव सुचवून आपण पायावर धोंडा पाडून घेतला, अशी खंत राज व्यक्त करतात) पण काळजी करू नका. हा धोंडा तुमच्या पायावर नाही तर विरोधकांच्या माथी पडणार आहे!

Read

.Read http://www.pressindia.wordpress.com/

VISIT

VISIT
www.aniruddhabadwebjp.blogspot.com

www.dainikyavatmalnews.com

Renika Gift And general Shoppy

Near State Bank

Pandharkawada

Dist Yavatmal - 07235227100, 228944

dainikyavatmalnews

Monday, January 21, 2008

READ DAILY SITE DAINIK YAVATMAL NEWS

LATEST NEWS
LATEST PHOTOS
AND
ALL DETAILS NEWS IN ONLY

www.dainikyavatmalnews.com

Number of farmers in India overstated: Survey

NEW DELHI: India's Chief Statistician Pronab Sen on Monday said the country has far less number of farm households than what the official records, based on NSSO surveys, reveal. "Number of people depending on agriculture is being overstated," he said while addressing a conference on 'Productivity Growth in a Globalising Economy: Implications for Business and Policy', organised by think tank ICRIER in Delhi. Sen attributed the discrepancy to survey methodology and reporting problems. The NSSO data suggests that almost 50 per cent of the income in rural areas is coming from non-agriculture sources, Sen said, adding that "it means that half of the agriculture households are engaged in non-agriculture activities." There is also a problem of reporting, he said, as people living in rural areas claim themselves to be farmers though they earn a large portion of their income from non-agriculture activities. As a result, Sen added, even non-farmers are being counted as farmers in official records. Sen's assertion assumes significance in view of the ongoing debate to move people from agriculture to other sectors of the economy. Commenting on deceleration of manufacturing and acceleration of services sector, Sen said economic analysts should keep in mind the fact that several manufacturing companies have started outsourcing activities, which they used to do themselves. Shedding of various activities by corporates, he said, is responsible for high growth of services, and that need not necessarily be construed as slowdown of manufacturing.

Wednesday, January 9, 2008

www.dainikyavatmalnews.com

ASHISH BADWE
EDITOR
DAINIK
YAVATMAL NEWS
WEBSITE IS www.dainikyavatmalnews.com
Email address is info@dainikyavatmalnews.com
ashishbadwe@gmail.com
ashish_badwe@yahoo.co.in
Contact No is - 9422167205, 9890397205