Friday, May 9, 2008

लोकमंगल बँक व्याख्यानमाला

सोलापूर दि।६ मे २००८ हसणे आणि प्रेम यांचा मोठा संबंध आहे। प्रेम वाढले की हसणे वाढते आणि हसणे वाढले की प्रेम वाढते।त्यामुळे आयुष्यात आनंद हवा असेल तर लहान मुलांप्रमाणे जगा।सध्या जीवनातील हास्य हरवले आहे¸ त्यामुळे आनंदी जिवण जगण्यासाठी हसणे महत्वाचे असल्याचे मत मकरंद टिल्लु (पुणे)यांनी व्यक्त केले। लोकमंगल बँकेच्या दशकपूर्ति समारंभानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालयातील अँम्पी थियटरमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत टिल्लु बोलत होते। हास्यावलोकन हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता।आपल्या व्याख्यानात मनमुराद हसवत त्यांनी जीवनातील हसण्याचे महत्त्व सांगितले । सध्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण तणावाखाली आहे। हसायलाही वेळ नाही। आपल्यातील जिवंतपणा हरवला आहे । अशा परिस्थितीमध्ये हास्ययोग शास्त्रीय दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे। सध्याच्या वृत्तमालिकांमध्ये स्त्रियांचे चुकीचे दर्शन घडविले जात आहे ¸ याला रोखण्याची गरज असल्याचे टिल्लू म्हणाले।उन्हाळा एन्जॉय करा टिल्लू यांनी आपल्या व्याख्यानातून हास्याचे धबधबे निर्माण केले। पावसामध्ये भिजून आपण पावसाळा एन्जॉय करतो। थंडीमध्ये आइस्क्रीम खाण्यासाठी जाऊन हिवाळा एन्जॉय करतो मग उन्हाळयाबाबत तिरस्कार का हो ? असे म्हणत ते म्हणाले ¸ डोक्यातून घाम गळताना किती छान वाटतय असे समजून उन्हाळा एन्जॉय करा ¸ असे टिल्लू यांनी सांगताच उन्हाळयात हास्याचे फवारे उडाले।

Sunday, April 13, 2008

तीन कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत!

रोजगार मंत्रालय : तरुणांना बेरोजगार भत्ता देण्यास केंद्र सरकारचा विरोध"बेरोजगार भत्ता' युवकांमधील आळशीपणाला खतपाणी घालतो आणि युवाशक्तीचा उत्पादक कार्यातील सहभाग कमी होतो. त्यामुळे बेरोजगारांना "भत्ता' देऊ नये, असे केंद्र सरकारचे मत असल्याने त्यासाठीची उपोषणे आणि आंदोलने आता थंडावणार आहेत. दुसरीकडे देशभरातील सुमारे तीन कोटी युवकांचे डोळे रोजगारासाठी सरकारी योजनांकडे लागलेले असताना रोजगार विनिमय केंद्रांतून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी मात्र नगण्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.देशातील 15 ते 29 वयोगटातील हे युवक योग्य रोजगार संधींची वाट पाहत असून, शैक्षणिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत महाराष्ट्रातील सुमारे तीस लाख युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये नोकरीच्या प्रतीक्षेतील युवकांची संख्या सर्वाधिक म्हणजे सुमारे 46.5 लाख असून, महाराष्ट्रापाठोपाठ केरळ आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांत मिळून एकूण सुमारे 50 लाख युवक नोकरीच्या योग्य संधींची वाट पाहत आहेत. राज्यांतील रोजगार विनिमय केंद्रे मात्र बेरोजगारीची ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचे दिसत आहे. डिसेंबर 2007 अखेर देशातील दोन लाख 63 हजार युवकांना या केंद्रांमार्फत खासगी व सार्वजनिक क्षेत्रांत रोजगार मिळाला आहे.बेरोजगारांची शक्ती विकासकामांकडे वळविण्याची गरज व्यक्त होत असतानाच, बालमजुरीची समस्यादेखील समूळ नष्ट करण्यासाठी राज्यांनी पुढाकार घेण्याबाबत केंद्र आग्रही आहे.

हिंदुत्ववाद्यांचा "कोल्हापूर बंद' शांततेत
कोल्हापूर, ता. १३ ः हिंदुत्ववादी संघटनांनी आज पुकारलेला कोल्हापूर बंद शांततेत पार पडला. कारवाई करताना पोलिसांकडून पक्षपातीपणा होत असल्याच्या कारणावरून हा बंद पुकारला होता. आज रामनवमी असल्याने आंदोलनकर्त्यांनीच रिक्षा आणि बस वाहतूक सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे तुरळक प्रमाणात वाहतूक आणि व्यवहार सुरू राहिले. व्यापाऱ्यांनी मात्र कडकडीत बंद पाळला.

The Sakaal Blog: तीन कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत!

The Sakaal Blog: तीन कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत!

Friday, April 11, 2008

The Sakaal Blog: नियम न पाळणारी रुग्णालये बंद करून टाका

The Sakaal Blog: नियम न पाळणारी रुग्णालये बंद करून टाका

Tuesday, April 8, 2008

पांढरकवडा ग्रिनसिटी या विशेष पानाला सुरुवात

अकोला येथुन प्रसिध्द होणाय्रा दै. मातृभुमी या वृत्तपत्रात येत्या ६ एप्रील पासुन गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पांढरकवडा ग्रिनसिटी या विशेष पानाला सुरुवात होत आहे. अमरावती येथुन प्रसिध्द होणाय्रा एका वृत्तपत्रात यापुर्वी हे पान संपादक अनिरूध्द बडवे हे प्रसिध्द करीत होते या पानाला केळापुर तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग लाभला होता. मात्र यवतमाळ येथील व्यवस्थापनासोबत निर्माण झालेल्या वादामुळे अनिरूध्द बडवे यांनी त्या वृत्तपत्राची ही सेवा बंद केली. मात्र तालुक्यातील वाचकांच्या आग्रहाखातर आता हे विशेष पान लोकप्रीय दै. मातृभुमीत वाचावयास मिळणार आहे. तसेच हे पान इंटरनेट वरही पाहता येणार आहे त्याकरिता वाचकांना फक्त www.dainikyavatmalnews.com या वेब न्युज पेपरवर सर्फिंग करून (log on करून ) पांढरकवडा या पर्यायावर माउस क्लिक करावा लागणार आहे. अधिक माहिती करीता ९४२२१६७२०५ या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Friday, April 4, 2008

मातृभुमिच्या पांढरकवडा पानाला ६ एप्रील पासुन प्रारंभ

मातृभुमिच्या पांढरकवडा पानाला ६ एप्रील पासुन प्रारंभ
www.dainikyavatmalnews.com
अकोला येथुन प्रसिध्द होणाय्रा दै. मातृभुमी या वृत्तपत्रात येत्या ६ एप्रील पासुन गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पांढरकवडा ग्रिनसिटी या विशेष पानाला सुरुवात होत आहे. अमरावती येथुन प्रसिध्द होणाय्रा एका वृत्तपत्रात यापुर्वी हे पान संपादक अनिरूध्द बडवे हे प्रसिध्द करीत होते या पानाला केळापुर तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग लाभला होता. मात्र यवतमाळ येथील व्यवस्थापनासोबत निर्माण झालेल्या वादामुळे अनिरूध्द बडवे यांनी त्या वृत्तपत्राची ही सेवा बंद केली. मात्र तालुक्यातील वाचकांच्या आग्रहाखातर आता हे विशेष पान लोकप्रीय दै. मातृभुमीत वाचावयास मिळणार आहे. तसेच हे पान इंटरनेट वरही पाहता येणार आहे त्याकरिता वाचकांना फक्त www.dainikyavatmalnews.com या वेब न्युज पेपरवर सर्फिंग करून (log on करून ) पांढरकवडा या पर्यायावर माउस क्लिक करावा लागणार आहे. अधिक माहिती करीता ९४२२१६७२०५ या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
NEWS INDIA
NEWS INDIA PRESS

Wednesday, March 26, 2008

गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांच्या आत्महत्या


गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांच्या आत्महत्या






पांढरकवडा - गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीने दिली आहे. ही लज्जास्पद बाब असल्याची प्रतीक्रीया विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकाने कर्जमाफिची घोषणा करूनही शेतकय्रांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहित यामुळे कर्जमाफीची घोषणा पुर्णपणे फोल ठरली आहे. या घोषणेचा फायदा पश्चीम महाराष्ट्रातीलच शेतकय्रांना होतो आहे. विदर्भातील शेतकरी मात्र या बाबतीतही नागावल्याच गेला आहे. किशोर तिवारी यांनी पुन्हा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावरून सरकारला पुन्हा धारेवर धरले विदर्भाचे बाळासाहेब ठाकरे अशी ख्याती प्राप्त असलेल्या तिवारींनी ४ दिवसात २४ शेतकय्रांच्या आत्महत्या म्हणजे लाजीरवाणी बाब असल्याची तिखट प्रतिक्रीया यवतमाळ न्युज, न्युज इंडीया जवळ व्यक्त केली.