Wednesday, March 26, 2008

गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांच्या आत्महत्या


गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांच्या आत्महत्या






पांढरकवडा - गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीने दिली आहे. ही लज्जास्पद बाब असल्याची प्रतीक्रीया विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकाने कर्जमाफिची घोषणा करूनही शेतकय्रांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहित यामुळे कर्जमाफीची घोषणा पुर्णपणे फोल ठरली आहे. या घोषणेचा फायदा पश्चीम महाराष्ट्रातीलच शेतकय्रांना होतो आहे. विदर्भातील शेतकरी मात्र या बाबतीतही नागावल्याच गेला आहे. किशोर तिवारी यांनी पुन्हा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावरून सरकारला पुन्हा धारेवर धरले विदर्भाचे बाळासाहेब ठाकरे अशी ख्याती प्राप्त असलेल्या तिवारींनी ४ दिवसात २४ शेतकय्रांच्या आत्महत्या म्हणजे लाजीरवाणी बाब असल्याची तिखट प्रतिक्रीया यवतमाळ न्युज, न्युज इंडीया जवळ व्यक्त केली.

Monday, March 24, 2008

आत्महत्या देशाला काळीमा फासणाय्रा - किशोर तिवारी

सांगा अश्रृंचा रंग कोणता ?
आत्महत्या देशाला काळीमा फासणाय्रा - किशोर तिवारी
www.newsindiapress.blogspot.com
www.dainikyavatmalnews.com

राज्य सरकारने चार हजार कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. परंतु कापुस उत्पादक शेतकय्रांना मदत, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा व शिक्षणावर सवलत, यासारख्या आत्महत्या रोखण्याच्या उपायावर एक दमडीही दिली नाही. - किशोर तिवारी, अध्यक्ष विदर्भ जनआंदोलन समिती

यवतमाळ - देशातील राजकीय नेते जेव्हा रंगपंचमीच्या रंगात रंगत होते, त्याचवेळी विदर्भातील १० कापुस उत्पादक शेतकय्रांच्या घरात त्यांचे कुटुंबिय आत्महत्येचा शोक व्यक्त करून अश्रृंचा रंग कोणता याचे उत्तर शोधत होते, अशी प्रतिक्रीया विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. होळी सणाच्या दरम्यान जनआंदोलन समितीला प्राप्त झालेल्या आकडेवाडी नुसार विदर्भातील दहा कापुस उत्पादक शेतकय्रांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. या आत्महत्या म्हणजे स्वतंत्र भारताला काळीमा फासणारी घटना असल्याचे मत तिवारी यांनी व्यक्त केले आहे. होळी सणाचे दरम्यान ७२ तासात मनोहर शालीग्राम राऊत (अंतरगांव जि. यवतमाळ), विठ्ठल दडमल (रा. गोजी जि. वर्धा), सुखदेव सुरपाडी रा गाढा जि. नागपुर), दिगांबर भिमराव मुळे (रा. गोध्री जि. बुलढाणा), शालिक गोमाजी राऊत (रा. टेंभरी जि. भंडारा), विनोद शेळके (रा. बिरसिंगपुर जि. भंडारा), सुरेश जागृत रा. हिवरखेड जि.बुलढाणा), पांडुरंग धर्मा इंगळे (रा. झोगडा जि. बुलढाणा) प्रमोद फसले (रा. हनवाडी जि. अकोला), पतरू नानाजी वाढई (रा. लेखा जि. गडचिरोली), या विदर्भातील १० कापुस उत्पादक शेतकय्रांनी नापिकी, कर्जबाजीरी पणामुळे आपली जिवनयात्रा संपविली आहे. कर्जमाफिनंतरही विदर्भातील शेतकय्रांचे आत्महत्येचे सत्र थांबलेले दिसुन येत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात, म्हणुन संपुर्ण भारतातील चार कोटी शेतकय्रांना ६० हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतरही सरकार खात्याने दोन हेक्टर व ३१ मार्च २००७ ची अट जाहीर केल्यामुळे विदर्भातील ३४ हजार शेतकरीच कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. राज्य सरकारने गाजावाजा करून शेतकरी अर्थसंकल्प सादर केला. परंतु, विदर्भातील शेतकय्रांना दमडीही दिली नाही. त्यामुळेच शेतकय्रांच्या आत्महत्येचे सत्र थांबायचे नाव घेत नाही परिणामी शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. कर्जमाफी देतांना देशभरातील ९० टक्के शेतकय्रांना सरकारने वंचीत ठेवले आहे. राज्य सरकार कापुस उत्पादक शेतकय्रांसाठी भरघोस मदत करील अशी आशा शेतकय्रांना होती. परंतु अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा विदर्भातील कापुस उत्पादक शेतकय्रांची निराशाच झाली आहे. अशी टिका किशोर तिवारी यांनी केली. राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात कापुस उत्पादक शेतकय्रांमध्ये निराशा वाढीस लागली. कर्जबाजारीपणामुळे ८ तासाला एका शेतकय्राने आत्महत्या केली. दरम्यान, विस हजारांवर शेतकय्रांनी आत्महत्या केल्याचेही तिवारी यांनी म्हटले आहे. शेतकय्रांना कापसाचा अग्रीम बोनस म्हणुन प्रती हेक्टर दोन हजार अशी मदत यावर्षी घोषीत करण्यात येईल. तसेच शेतकय्रांच्या सावकारी कर्जाचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार तरतुद करेल, अशी घोषणा सरकारने केली होती. याकडे जनआंदोलन समितीने लक्ष वेधले आहे.

After Central Govt. now Maharashtra Govt. Budget too failed to address vidarbha agrarian crisis :No relief for food security and health care to Distressed Dying cotton farmers.

Nagpur-19th march 2008
Today Maharashtra govt. too failed to give any relief to vidarbha cotton farmers after big loan waiver of Indian govt. failed to provide any debt relief to more than 90% vidarbha cotton farmers due it's upper cap to 2 hector and cut off date being 30th march,2007 as it was expected that next being election year maharashtra govt. would restore cotton price or announce the rs.2000 per hector subsidy to cotton farmers but finance minister Maharashtra Jayant Patil failed to address this long pending important issue ,kishor tiwari president of vidarbha jan andolan samiti informed in a press release.the amount shown for irrigation project is part of vidarbha backlog and included in the AIBP hence this is not the relief asked by the cotton farmers.tiwari said.
The vidarbha region has witnessed the more than 20000 r of suicides by debt-ridden farmers in the last ten years of congress-ncp govt. but issue farm suicides is not being addressed due apathy of political parties and negative attitude of babus in the administration as even though state has shown the surplase of rs.400 crore in state budget but failed to relief aid such as food security,health care,food crop incentives free education to ward of distressed cotton farmers in order to stop on going farm suicides in region ,kishore tiwari added. .
Maharashtra govt has not taken any budtory step to help debt trapped vidarbha cotton farmers as "Close to 60 percent farmers in Vidarbha have a landholding of more than two hectares and most of them are in distress on the Maharashtra government's own admission and all such farmers in the region, which has witnessed a large number of suicides by debt-ridden farmers, would be deprived of the benefit announced by central govt "tiwari told..
Pointing out the absence of provisions for increasing farmers' income, price stabilization and incentives for low-cost farming that would have signalled a beginning of the quest for a durable solution to the agrarian crisis, Tiwari also questioned Maharashtra govt,s silence over food security and rural health.
Earlier the annual budget presented by Chidambaram has a farm loan waiver provision of Rs.600 billion intended to extend the benefit to 40 million farmers across the country. The one-time settlement would cover marginal and small farmers whose loans were rescheduled last year. kishor Tiwari's also demanded that a loan waiver up to Rs 50,000 rather than up to two-hectare land holding would have been more appropriate.
"The two-hectare cap would mostly benefit the sugarcane and grape cultivators in western and southern Maharashtra who have smaller land holdings but large-income-yielding agriculture because of the irrigation facility available there," tiwari added.
Kishor tiwari urged UPA Government to restore advance bonus and give rs.2700/- per quintal price as promised in the UPA manifesto. ".
Tiwari said most of the political parties are shedding crocodiles tears over the insult of cotton farmer but they are not talking about finding solution to redress the hardships of the Vidarbha farmers. Presently most of the farmers who are committing suicides are victims of poverty and hunger that has resulted after the economic collapse in the Vidarbha region due ongoing agrarian crisis.
"We demand urgent step to provide food security and health care facilities to these dying farmers before making arguments over farm suicides being agrarian or non-agrarian. Now the time has come to give complete loan waiver and price protection on all agriculture produce from free trade in WTO era to Vidarbha dying farmers", Tiwari added.

Tuesday, March 18, 2008

अत्याधुनिक शाळेचे पद्मश्री डाँ विजय भटकर यांच्या हस्ते उदघाटन



पुणे (आशिष बडवे) - राँयसी इंटरनँशनल स्कुल या नावाने नसँरी व प्ले ग्रुपसाठी अत्याधुनिक शाळेचे उदघाटन पद्मश्री डाँ विजय भटकर यांच्या हस्ते आज विश्रांतवाडी येथे करण्यात आले. यावेळी राँयसी इंटरनँशनल स्कुलचे चेअरमन श्री अभिजीत शिर्के, अध्यक्ष अनिरूध्द शिर्के, योगमहर्षी पाडेकर, डाँ. धुमाळ उपस्थीत होते. यावेळी डाँ. भटकर म्हणाले. की देशात व परदेशात विज्ञान, कृषी, औद्योगीक, तंत्रज्ञान शिक्षण, वैद्यकीय, औषध निर्मीती, आयुर्वेद, योगा, अन्नप्रक्रीया, जैवतंत्रज्ञान, उर्जा क्षेत्रात नविन तंत्रज्ञानाचा वापर व विकास हे उद्दीष्ट समोर ठेवले आहे. सध्याच्या आधुनिक शिक्षण पध्दतीत अद्यावत तंत्रज्ञान जगासमोर आणण्याचा राँयसी इंटरनँशनल स्कुलचा उपक्रम स्तुत्य आहे. एस्. एन. एस चँरिटेबल फाँउंडेशन च्या माध्यमातुन चालविल्या जाणाय्रा अनेक उपक्रमांपैकी हा एक आहे. एकविसाव्या शतकातील आव्हानांना नजरेसमोर ठेवणे हा शाळेचा उपक्रम आहे. संगीत खेळ, कला, क्रीडा, अशा गुणांनी संपंन्न अष्टपैलु व्यक्तीमत्व तयार करण्यासाठी मेहनत आहे. यातील सर्वोत्तम शिक्षण देणे हेच आमचे लक्ष असणार आहे. यासाठी महात्मा गांधी, अनुताई वाघ डाँ खानसे या सारख्या लोकांनी केलेल्या अभ्यासातुन तयार करण्यात आलेली Multiversity Gurukul ही संकल्पना फार उपयुक्त आहे. शिशुवर्गात होणारे संस्कार फार महत्वाचे असतात, असे म्हणतात की वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत माणुस ६ भाषा शिकु शकतो. म्हणुणच येथे जो उपक्रम चालविला जाणार आहे, तो चांगला आहे. व्हीडीऒ काँन्फरसींग आहे. शिवाय टी. व्ही. व्दारे एज्युकेशन टु होमची कल्पना राबविण्यात येईल, अभिजीत व अनिरूध्द शिर्के यांच्या सारख्या प्रयोगशिल व्यक्तीमत्वाकडुन हे घडत आहे. ते प्रशंसनिय आहे. या अगोदर त्यांनी बायोडीझेल, इथेनाँल, शेती, औषधे या सारख्या व्यवसायात ते सिध्द केले आहे. त्याला आता आयुवैद व योगाची साथ मिळते आहे. अजुनही बरचं काही करण्याची संधी आहे. नवनविन संस्था, शाळा, व्यक्ती यांच्याकडुन मिळणाय्रा कल्पना, योगदान यांचेही स्वागत होईल. या शाळेच्या माध्यमातुन डाँ अब्दुल कलाम यांचे सुसंस्कृत भारताचे स्वप्न नजीकच्या काळात साकार करता येईल. अनिरूध्द शिर्के म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पध्दतीत असलेल्या उणिवांमुळे Multiversity Gurukul पध्दतीची गरज वाटते. या पध्दतीत शास्त्र, शिक्षण ह संस्कार यांचा मिलाप साधण्यात आला आहे. ही पध्दत डाँ. भटकर सरकाय्रांच्या अथक परिश्रमातुन तयार झाली आहे. राँयसी इंटरनँशनल स्कुल ही आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर या गुरूकुल पध्दतीचा अवलंब करणार आहे. अधुनिक जगात संस्कारक्षम सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम याव्दारे एस्. एन. एस चँरिटेबल फाँउंडेशन करणार आहे. तसेच झरना सेंटर च्या माध्यमातुन योगा, कराटे, नृत्य, एरोबिक्स या विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. योगा या क्षेत्रात अगदी एक दिवसाच्या प्रशिक्षणापासुन पदविका व पदविपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातुन लाखो योगाचे शिक्षक तयार करण्याचे आव्हान ही स्विकारले आहे. मा पाडेकर सर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पुण्यातील बाणेर व विश्रांत वाडी मधील झरना सेंटरच्या माध्यमातुन हे काम होणार आहे. योग महर्षी पाडेकर म्हणाले, योग आणि रोग यांची सांगड घालुन आज योगाकडे पाहिल्या जाते जे दुर्दैवी आहे. योग हा केवळ रोगासाठी नसुन तो परिपुर्णतेसाठी आहे. योगा हो केवळ म्हातारा झाले की शिकावे असा गैरसमज आहे. डाँ भटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यासाठी भरपुर मेहनत घेत आहोत. अभिजीत शिर्के व अनिरूध्द शिर्के यांनी उपक्रम हाती घेतला आहे. तो स्तुत्य आहे. मुलांना लहान वयात योगाचे मार्गदर्शन केले तर ते चांगला समाज घ़डवतील. झरना सेंटरच्या उपक्रमास माझ्या मनापासुन शुभेच्छा व त्यांनी मी पुर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. अभिजीत शिर्के म्हणाले की, देशात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. तसेच नव्याने २५ लक्ष रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचा फायदा करून घेण्या करीता कुशल तंत्रज्ञान, व्यवसायीक शिक्षण व रोजगारभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राँयसीच्या अनेक शाखा देशात व परदेशात आगामी काळात सुरू करण्यात येणार आहेत सध्या स्थितीत प्ले ग्रुप व नर्सरीच्या माध्यमातुन सदर प्रकल्पास सुरूवात झाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रचना गोस्वामी यांनी केले, सुत्रसंचालन श्वेता चारी यांनी केले.

Friday, March 14, 2008

कर्मभुमिच्या गुणगाणात शत्रुघ्न सिन्हाच चुकले काय?

बेजबाबदार ईलेक्ट्राँनिक्स माध्यम तोडताहेत अकलेचे तारे
मुंबई - मराठी माणुस, भुमिपुत्र या मुद्यांवर सध्या जे काही चालंतेय त्यात राजकारण नाही. असं छातीठोकपणे कुणी सांगु शकणार नाही. ज्यांच त्यांचं राजकारण ज्याला ज्याला त्याला सखलाभ असो. सामान्य मुंबईकर, मराठी माणुस न भडकता डोकं शांत ठेवुन आहे. त्याबद्दल त्याचं, त्याच्या सहनशिलतेचं कौतुक करायला हवं समुद्राच्या खारट पाण्याशेजारी राहणारा मुंबईकर सडक्या डोक्याचा आहे. असं त्याचं कौतुक होवुनही तो शांत बसतो, याला दादच द्यायला हवी. बेजबाबदारपणे अकलेचे तारे तोडणाय्रा आणि टिआरपी च्या नादात ताळतंत्र सोडलेल्या वृत्तवाहिन्यांना हा मुंबईकर जनतेचा अपमान वाटत नाही काय? तसेच तर त्यांना पत्रकारितेतील मुलतत्वे, मुलभुत शिक्षण नक्कीच नव्याने देण्याची गरज आहे. बातमी ही पवित्र असते, टिप्पणीपासुन मुक्त असते. हे जे काही पत्रकारितेच्या शिक्षणात शिकविले जाते, तेच ही मंडळी विसरली आहे एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखी हिंदी वृत्तवारहिन्यांच्या सुत्रधारांची आहे. मराठी - बिगर मराठी असा वाद पेटवितांना ते कमालीचे उत्तेजीत होतात. त्यांची जन्मभुमी कुठलीही असो मात्र, कर्मभुमी मुंबईत स्टुडीऒ असुनही ते मुंबईकर झालेत असे त्यांच्या भुमिकेवरून वाटत नाही. त्यांनी नक्कीच शत्रुघ्न सिन्हाकडुन कर्मभुमीच्या बांधिलकीचे धडे घ्यायला हवेत सारे हिंदी भाषीक वृत्तनिवेदक, संकुचीत, भाषीक राजकारण करू पाहत आहेत. अशा उथळ आणि थिल्लर वृत्तवाहिन्यांवर काही काळ बंदी लादण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मुळचे मराठी असलेले मात्र सध्या हिंदी वृत्तवाहिन्यांमध्ये वार्ताहर म्हणुन काम करीत असलेल्या मुलांची केविलवाणी अवस्था झाली आहे. बाँसचा आदेश मानण्याच्या नादात आणि त्यांना खुष करण्यासाठी वस्तुस्थितीशी विसंगत, अवास्तव आणि मातृभुमिशी प्रतारणा करणारे वार्तांकन आपण करीत आहोत, याचे भानही त्या बिचाय्रांना नाही. शत्रुघ्न सिन्हाला मुंबईने मोठे केले. नावारूपाला आणले. त्याने कर्मभुमिला नतमस्तक होवुन तिचे ॠण शब्दात व्यक्त केले तर त्यात कुणाच्याही पोटशुळ उठण्याचे कारण काय? महाराष्ट्रात राहुन तो जय महाराष्ट्र म्हणत असेल तर चुकले कुठे? ३०० नोकय्रांपैकी २७५ बाहेरचे भरल्या जात असतील तर तो भुमिपुत्रांवर अन्याय आहे. हे त्याचे मत याग्यच आहे. कुणी ते नाकारणार आहे काय? शत्रुघ्नला व्यक्तीगत शिवसेना प्रमुखांबद्दल आदर असेल तर त्याला बिहारद्रोही कसे ठरविणार? कुणाही मराठी माणसाला कुणाबद्दलही व्यक्तीगत आदर आणि प्रेमाच्या भावना असु शकत नाही काय? शत्रुघ्नने फक्त कर्मभुमिचे गुणगाण केलेय, जन्मभुमिबद्दल एक अवाक्षरही बोलला नाही, तरिही त्याला चुकीचे ठरविले जातेय! बिहारची परिस्थीती इराक पेक्षाही गंभीर आहे. आणि मुंबई यापुढे अधिक लोंढे सहन करू शकणार नाही, या दोन्हीही बाबी सत्य आहेत. माध्यमांमध्ये सत्य सांगण्याची हिंमत नसेल तर गोबेल्स तंत्राने असत्याचा मारा रेटुन सर्वसामान्यांना निदान संभ्रमित तरी करु नका. मला आश्चर्य वाटते ते शिवसेनेचे! शिवसेना प्रमुखांना वेड्यांच्या ईस्पितळ्यात दाखल करा, असे अकलेचे तारे बिहारी खासदारांनी तोडल्यानंतरही शिवसैनिक शांत राहिला. त्याच्या संयमाचे कौतुकचं करायला हवे. मात्र अबु आझमी आणि वात्रट बिहारी खासदारांना आवळण्याची वेळ आता आली आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हा सारा वाद पेटविलाय तो म.न.सेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे वैर उध्दव ठाकरेंशी आहे , शिवसेनाप्रमुख त्यांना देवासमान आहेत. असे म्हणतात. मग देवावर चिखलफेक होत असतांना ते गप्प कसे? त्यांच्यावर तर आता भाषण बंदीही नाही. निदान बाळासाहेबांना वाट्टेल ते बोलणाय्रा माथेफिरू बिहारी नेत्यांचा निशेध तर ते नक्कीच करू शकतात ना ! शेवटी जाता जाता कर्मभुमी मुंबईबद्दलच्या आपल्या कृतज्ञतेच्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करणाय्रा शत्रुघ्नचे अभिनंदन! कृतघ्न मराठी वार्ताहरांनी त्यांच्यापासुन बांध घेतला तरी पुरे!

विक्रांत पाटील मुंबई देशोन्नती


VJAS welcomes Rahul Gandhi's proposal to wide loan waiver scheme to distressed vidarbha farmers
Nagpur-13TH MARCH 2008

VJAS(vidarbha jan andolan samiti) today welcome rahul gandhi's cut motion demand nd to centre that Rs.60k crore loan waiver to wider to vidarbha distressed farmers who are committing suicide since 1997 due huge debt trap as announced loan waiver kept more than 80% cotton farmers out of reach due to 2 hector cap ,it is reported by PTI to day QUOTE
Rahul Gandhi wants changes in loan waiver schemeCongress MP and party general secretary Rahul Gandhi suggested in Parliament on Thursday that there should not be one landholding ceiling to choose farmers whose loans the government proposes to waive, nor should there be a single cut-off date for the loan waiver scheme.
Rahul's speech in the Lok Sabha on Thursday, which touched upon the salient features of the budget and included a number of suggestions, was heard with rapt attention.
Stating that the land ceiling fixed at two hectares in the budget for the loan waiver for poor farmers should be changed, he said: "Land ceiling should be variable on the basis of land productivity".
Rahul also suggested that the cut-off date of June 30 for all farm loan waivers was unfair. "A single cut-off date will unfairly penalise the farmers. A localised cut-off date should be considered," he said, inviting a round of applause.
"There are two distinct voices in India today. One of the voices is easier heard... There is another voice. It is a deeper voice. It is not as loud... These people are no different from those doing well. They ask only to be given a voice," Rahul said, referring to those who have the potential but did not get the opportunity.
"Our policy is not to choose (between the two worlds) but to nurture them together," he said.
The young MP also mentioned the achievements made through the Right to Information Act, National Rural Employment Guarantee Scheme (NREGS), Bharat Nirman, Mid-Day Meal scheme and other government schemes for the people.
On NREGS, he said: "Freedom to work is not a charity but a right".
He also lauded the budget allocations for education and health. Complimenting the prime minister and the United Progressive Alliance (UPA) government for a budget for "aam aadmi" (common man), he praised the Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission, steps for strengthening Panchayati Raj (local self government) institutions and other schemes
UNQUOTE This is good move by congress party and centre should act soon so that distressed farmers one important issue is addressed, kishor tiwari president of vidarbha jan nadolan samiti informed in a press release.
earlier when Finance Minister P. Chidambaram on 29th feb. announced an agriculture loan waiver in the 2008-09 budget but a farmers' leader here said the move will not help most farmers in the Vidarbha region due to the two-hectare landholding cap. The region has witnessed the maximum number of suicides by debt-ridden farmers in the last few years.
"Close to 60 percent farmers in Vidarbha have a landholding of more than two hectares and most of them are in distress on the Maharashtra government's own admission", said Vidarbha Jan Andolan Samiti leader Kishor Tiwari.
He said all such farmers in the region, which has witnessed a large number of suicides by debt-ridden farmers, would be deprived of the benefit.
"I welcome the largely anticipated budgetary provision nevertheless in as much as a 'head' has been created but cannot help saying that even as a relief it is inadequate for the farmers in Vidarbha," Tiwari told..
Pointing out the absence of provisions for increasing farmers' income, price stabilization and incentives for low-cost farming that would have signalled a beginning of the quest for a durable solution to the agrarian crisis, Tiwari also deplored Chidambaram's silence over food security and rural health.
The annual budget presented by Chidambaram has a farm loan waiver provision of Rs.600 billion intended to extend the benefit to 40 million farmers across the country. The one-time settlement would cover marginal and small farmers whose loans were rescheduled last year.
kishor Tiwari's also demanded that a loan waiver up to Rs 50,000 rather than up to two-hectare land holding would have been more appropriate.
"The two-hectare cap would mostly benefit the sugarcane and grape cultivators in western and southern Maharashtra who have smaller land holdings but large-income-yielding agriculture because of the irrigation facility available there," tiwari added.

Sunday, March 9, 2008

विदर्भात आठ दिवसांत २२ आत्महत्या

visit www.dainikyavatmalnews.com

यवतमाळ (पांढरकवडा) - शेतक-यांच्या कर्जमाफीचे श्रेय केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे सुरू असताना आणि सोनिया गांधी यांना श्रेय देण्यासाठी काँग्रेस मेळाव्यांच्या तयारीत असताना विदर्भात गेल्या आठ दिवसांत २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी यवतमाळ न्युज व विदर्भ न्युज ला कर्जमाफी घोषणेनंतर विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावेच दिली. 'कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू आहे. या धतीर्वर विदर्भातील शेतकरी मेळाव्यात सोनिया गांधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देतील काय, हा खरा प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षात काही हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र त्यांच्या कुटुंबांना कोणी नुकसानभरपाई दिली नाही. कर्जमाफीचे श्रेय घेणाऱ्यांनी आत्महत्यांचीही नैतिक जबाबदारी घ्यायला हवी' असे तिवारी म्हणाले.
कर्जमाफीच्या घोषणेनंतर आत्महत्या केलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांची नावे : विजय गोकुळदास झंवर-बेळखेड (अमरावती), रमेश भगवान हिंगणकर-निमखेड बाजार (अमरावती), अमरसिंग भुरसिंग सोळंके-दोनवाडा (अकोला), कोल्हू पैकु फुंडे-बाम्पेवाडा (भंडारा), दुर्गादास देसा पवार-बोरी हजारा (यवतमाळ), नरेंद तोताराम चव्हाण-खापातांडा (नागपूर), सुभाष किसन तायडे-गाजीपूर टाकळी (अकोला), काशीनाथ दगडू वाघमारे-मोंढाळा, (बुलढाणा), संतोष रामचंद उबाळे-उमठा (नागपूर), विठ्ठल नामदेवराव वानखेडे-आमला (अमरावती), दत्तुजी चौधरी-नारा (वर्धा), वासुदेव बांगरे-गिरोली हेटी (गोंदिया), भगवंत फुलझेल-वेणी (वर्धा), हनुमंत चव्हाण-जळगाव (अमरावती), जगन्नाथ लट्ये-कन्हाळ (गोंदिया), ज्योती तंबाखे-चिजगाव (यवतमाळ), संजय ठाकरे-सिंदूरजपा (अमरावती), नागेश घोरपडे-चिंतनवाडी (अकोला), किसन रहाटे-पिंपळकुटी (यवतमाळ), रामदास म्हस्के-पांढरदेव (बुलढाणा), केशव शेळके-आवीर् (वर्धा), किसन उईके-खडकी (नागपूर)

Monday, March 3, 2008

पाटणबोरी रेंज मध्ये हजारो सागवान झाडांची अवैध कत्तल

पाटणबोरी रेंज मध्ये हजारो सागवान झाडांची अवैध कत्तल

पाटणबोरी रेंज मध्ये हजारो सागवान झाडांची अवैध कत्तल

पाटणबोरी रेंज मध्ये हजारो सागवान झाडांची अवैध कत्तल
लाखो रूपयाचे सागवान तस्करांच्या घशात
पांढरकवडा - पांढरकवडा वन विभागाअंतर्गत येत असलेल्या पाटणबोरी रेंज मध्ये हजारो सागवान झाडांची अवैध रित्या कत्तल झाली असुन सागवान तस्करांनी लाखो रूपये किंमतीचे सागवान जंगलातुन रातोरात कटाई करून चोरून नेले आहे. सागवान तस्करांशी रेंज च्या अधिकाय्रांचे अर्थपुर्ण संबंध असल्याने पाटणबोरी येथील रेंजर या गंभीर प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करित असल्याचा आरोप भाजपाचे तालुका सचिव अनिरूध्द बडवे यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपा व भाजयुमोच्या तालुका पदाधिकाय्रांनी जंगलात जावुन सागवान कटाईचे छायाचित्रण करून कटाईच्या प्रमुख दृश्यांची एक सिडी पुराव्यानिशी यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षक रामानुज चौधरी यांचेकडे सुपुर्द केली असुन तक्रार दाखल केली आहे. चौधरी यांचे कडुन या प्रकरणाची ७ दिवसाचे आत चौकशी केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. पांढरकवडा वन विभागातील लाखो रूपये किंमतीचे सागवान कटाईचे मोठे प्रकरण उघडकिस आल्याने वन विभागात एकच खळबळ माजली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटणबोरी रेंज मधिल मांडवी, निंबादेवी खैरी धरमगोटा, सुकही वडवाट कोदोरी कारेगांव व पाटणबोरी बिट मधिल जंगलांमध्ये हजारो सागवान झाडांची कटाई सागवान तस्करांनी केली आहे. परंतु पाटणबोरी येथील रेंजर यांचे सागवान तस्करांसोबत मैत्रीपुर्ण व अर्थपुर्ण संबंध असल्याने ते या प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुलर्क्ष करीत आहेत. पाटणबोरी रेंज मधिल जंगल नष्ट होण्याचे मार्गावर आले असुन पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपाचे तालुका सचिव अनिरूध्द बडवे, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष राहुल चिंतावार तालुका सरचिटणीस धनंजय ठाकरे, प्रितम नरांजे, सुभाष दरणे, प्रफुल सोयाम, रवि उईके यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी जंगलात भेटी दिल्या असता मोठ्या प्रमाणात सागवानाची कटाई आढळुन आली. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधीत भ्रष्ट अधिकाय्रांवर योग्य कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे पाटणबोरी येथील रेंजर यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतुन बडतर्फ करावे अन्यथा भाजपा व भाजयुमो तिव्र आंदोलन छेडेल असा ईशारा अनिरूध्द बडवे, राहुल चिंतावार यांनी दिला आहे.

Sunday, March 2, 2008

विदर्भातील शेतकय्रांना फारसा फायदा नाही. आत्महत्या वाढतील - प्रकाश पोहरे


विदर्भातील शेतकय्रांना फारसा फायदा नाही. आत्महत्या वाढतील - प्रकाश पोहरे
मुंबई - कर्जमाफीच्या निर्णयाचा विदर्भातील शेतकय्रांना फारसा फायदा होणार नाही. विदर्भात मुख्यता कोरडवाहु शेती असल्याने उत्तर महाराष्ट्र, पश्चीम महाराष्ट्र आणि कोकणच्या तुलनेत सरासरी जमिन धारणा क्षेत्र मोठे आहे. पश्चीम महाराष्ट्र सुमारे ८० टक्के शेतकरी हा पाच एकराखालील शेतीक्षेत्र असलेला अल्प भुधारक आहे. विदर्भात हे प्रमाण अवघे ४० टक्के आहे. पश्चीम महाराष्ट्रात तुलनेने सिंचन फलोत्पादन अशी शेतीची विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणावर झालेली असुन त्यापोटी कर्जाची उचलंही प्रचंड आहे. विदर्भात मात्र सिंचनाअभावी शेतीतील विकासकामांचे प्रमाण अत्यंत कमी असुन कर्जाचे प्रमाणही तुलनेने नगण्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जागृत लोकप्रतीनीधी शेतीच्या विकासाच्या अनेक योजना राबवुन आपला परिसर सुजलाम सुफलाम केला. विदर्भाच्या हिताच्या दृष्टीने पाच एकरांसोबत किमान दोन लाखापर्यंत कर्ज रक्कमेची मर्यादा घातली असती तर अधिक उत्तम ठरले असते. त्याचा खय्रा अर्थाने विदर्भातील असंख्य शेतकय्रांना फायदा होवुन आत्मरत्याग्रस्त भागाला दिलासा मिळु शकला असता. ऒलिता खालिल बागायतदार शेतकय्रांसाठी पाच एकराची मर्यादा योग्य असली तरी कोरडवाहु शेतकय्रांना कर्जमाफिचा कुठलाही फायदा होणार नाही. परिणामी गोंधळ व नैराश्याची परिस्थीती निर्माण होवुन विदर्भात आणखी महिन्याभरात आत्महत्यांचे प्रणेते प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केली आहे. पोहरे गेली १५ वर्षे शेतकरी आंदोलनात सक्रीय आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाला वाचा फोडुन मुख्यमंत्री, पंतप्रधानांपासुन राष्ट्रपतींपर्यंत त्यांनी या विषयाचे गांभीर्य रेटुन धरले. आत्महत्याग्रस्त शेतकय्रांच्या कुटुंबियांना मदतीसाठी उच्च न्यायालयात लढा देवुन अखेर त्यांनी दिलासा मिळवुन दिला. कर्जमुक्तीच्या संदर्भात नवी दिल्ली येथे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या समोर जेष्ठ नेते मोहन धारिया यांच्या समवेत पोहरे यांनी अडीच तास सदरीकरण करून चर्चा केली होती. त्या चर्चेतील ५ एकरापर्यंतच्या अल्प, अत्यल्पभुधारक शेतकय्रांना कर्जमाफिचा निर्णय अभिनंदनास्पद आहे. मात्र, कोरडवाहु शेतकय्रांना सरसकट कर्जमाफीची मागणी मान्य न केल्याने त्याचे विदर्भातील दुरगामी अतिशय वाईट परिणाम होतील, अशी भितीही पोहरे यांनी व्यक्त केली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांची भेट
पांढरकवडा - (आशिष बडवे) - पतिचे आत्महत्येला दोन वर्षे पुर्ण होवुनही शासनाची मदत मिळाली नाही अशा परिस्थितीत दोन लहान मुलांचे पालन पोषण कसे करावे ही चिंता मला सतत सतावित असल्याची कैफियत यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील भाडउमरी येथील आत्महत्या केलेल्या वंदना अनिल शेंडे या विधवेने केंद्रीय पंचायत राज युवक कल्याण व क्रीडामंत्री मणिशंकर अय्यर यांचे पुढे मांडली. नागपुर येथुन कारने त्यांनी सरळ भाडउमरी येथे दोन वर्षापुर्वी आत्महत्या केलेल्या अनिल शेंडे या शेतकय्राची पत्नी वंदना शेंडे हिचे घर गाठले व तिचे सात्वन करून तिच्याविषयी माहिती जाणुन घेतली. माझे पती अनिल शेंडे यांनी ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी आमचेवर ८५ हजार रूपये कर्ज होते त्यात बँकेचे १५ हजार रूपये व ७० हजार रूपये खाजगी सावकारांचे होते असे वंदना शेंडे हिने सांगितले. साडेतिन एकर शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करित असतांना कर्जाचे ऒझे सतत वाढत चालले होते. त्यामुळे माझे पती सतत चिंतीत राहत होते. ज्वारी गहु यासारखी कुटुंबाची पालन पोषण करणारी धान्यांची पिके घेण्याऐवजी आपण कापसाचे पिक कर्ज बाजारी होत असतांना सुध्दा का घेत होता अशी विचारणा मणिशंकर अय्यर यांनी करताच कर्जाची परतफेड करता यावी म्हणुन कापसाचे पिक घेत होतो परंतु सतत तिन वर्षे नापिकी झाल्याने त्यांनी आत्महत्या केली माझे पती मरून दोन वर्षे पुर्ण झालीत परंतु शासनाकडुन मला कुठलिही मदत मिळाली नाही. पंतप्रधान पँकेज अंतर्गत १० हजार रूपयाची तोडकी मदत मिळाली की जो चेकही बाउन्स झाला. वंदना शेंडे या विधवेच्या दोन बालकांना पाहुन त्यांचे मन गहिवरले त्यांनी लगेच मुलांना मांडीवर बसवुन घेत त्यांची विचारपुस केली. यावेळी त्याच गावात आत्महत्या केलेल्या नंदा भेंडारे या विधवा महिलेची देखिल मंत्र्यांनी आस्थेने विचारपुस केली. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आपण जर नोंद केली तर आपणास १५ दिवसात काम मिळते हे आपणास माहिती आहे की नाही अशी विचारणा केली असता त्यांनी ती माहिती नसल्याचे सांगितले. आत्महत्या करण्यांमागची काही सामाजीक कारणे आहेत काय? असा प्रश्न उपस्थीत केला असता सामाजिक कारणांपेक्षा आर्थिक कारणांमुळे आत्महत्या होत असल्याची माहिती गावकय्रांनी दिली. अर्थंसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेतकय्रांचे कर्ज माफ केले असल्याचे मंत्र्यांनी सांगताच या विधवांनी या कर्ज माफीवर नापसंती व्यक्त केली. २ हेक्टर म्हणजे ५ एकर पर्यंतच्या शेतकय्रांना कर्ज माफी मिळत आहे तेव्हा माझ्या पतिने आत्महत्या केली परंतु माझेजवळ सात एकर जमिन आहे तेव्हा मला या कर्जमाफिचा काहिच फायदा झाला नाही तेव्हा आत्महत्या केलेल्या विधवांचे कर्ज मग ती कितीही एकर जमिन असो माफ करावे अशी मागणी या विधवा महिलांनी केली. मणिशंकर अय्यर यांनी या समस्या शांतपणे ऐकुण घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंत्र्यांसोबत विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, पत्रकार पी साईनाथ, मोहन मामिडवार, कृषी भुषण अरूण ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.
पांढरकवडा नगर परिषदेचा १२ कोटींचा अर्थसंकल्प
पांढरकवडा - पांढरकवडा नगर परिषदेचे सन २००८ - २००९ चे २ कोटी ८ लक्ष शिल्लकीचे अंदाज पत्रक आज सादर केले. ११.७६ कोटी रूपयाच्या अर्थसंकल्पात क्रीडा संकुल, शिक्षण व आरोग्य, रस्ते सौंदर्यीकरण आणि नागरी सुविधांवर भर दिला जाणार आहे. सभागृहात एकमताने या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. सन २००७ - २००८ चे सुधारीत व सन २००८ - २००९ च्या खर्चाची तरतुद असणारा ९ कोटी ६८ लाख रूपयाचा अर्थसंकल्प आजच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यामध्ये शासकीय निधी व नगर परिषदेचा राखिव निधी वजा जाता हे अंदाज पत्रक २ कोटी ८ लक्ष शिल्लकीचे राहणार आहे. नगराध्यक्ष भा़ऊराव मरापे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.