Saturday, June 28, 2008

पंतप्रधान पँकेजच्या दोन वर्षानंतरही कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत

पंतप्रधान पँकेजच्या दोन वर्षानंतरही कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत
बँकांनी पिक कर्ज नाकारलेल्या आणखी ५ शेतकय्रांच्या विदर्भात आत्महत्या
नागपुर (आशिष बडवे) - पंतप्रधानांनी १ जुलै २००६ रोजी ३ हजार ७५० कोटीचे विषेश पँकेज पश्चीम विदर्भाला दिल्यानंतर त्या पँकेजचे तिनतेरा वाजले आहे २९ फेब्रुवारीला ६० हजार कोटींची कर्जमाफी व त्यानंतर विदर्भाच्या शेतकय्राला याचा फायदा होत नाही म्हणुन ती वाढवुन ७१ हजार कोटी रूपयावर नेल्यावरही पश्चीम विदर्भातील ३० लाख नैराश्यग्रस्त कापुस उत्पादक शेतकय्रांना दिलासा देण्यास सरकारला अपयश आले आहे. नैराश्यग्रस्त शेतकय्रांना कर्जाच्या बोझ्यामुळे व बँकांच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही आत्महत्या कराव्या लागत असुन मागील २ दिवसात गणेश उध्दव माकडे रा. आमगाव जि. बुलडाणा, भाऊराव महादेव ईगळे रा गरूड जि. अमरावती, पांडुरंग मदाळे रा. मोझर जि. यवतमाळ देवराव चव्हाण रा. पाथ्रड जि. यवतमाळ, दिपक अवधुत ऒळंबे रा. खापरवाडी जि. अकोला या ५ शेतकय्रांना आत्महत्या केल्यामुळे पंतप्रधानांच्या पँकेजच्या घोषणेनंतर २२८७ शेतकय्रांनी आत्महत्या केल्याची माहीती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. विदर्भातील सर्व शेतकय्रांचे कर्ज माफ होत आहे. अशा प्रकारचे संकेत भारताचे कृषी मंत्री शरद पवार यांनी अकोला येथे २० आँक्टोंबर २००७ रोजी दिल्यानंतर बँकेच्या वसुली पुर्णपणे ठप्प झाल्या आहेत. मात्र २९ फेब्रुवारीला सरकारने कर्जमाफी घोषीत केल्यानंतर ५ एकराची अट टाकल्यामुळे ९० ट्क्को शेतकरी कर्ज माफीपासुन वंचीत राहीले. महाराष्ट्र शासनाने व सर्व राजकीय पक्षांनी कर्जमाफीची मर्यादा १५ एकर किंवा सरसकट ५० हजाराचे कर्ज माफ करण्याची मागणी केली होती. परंतु सरकारने वाढीव कर्जमाफीमध्ये सुध्दा कापुस उत्पादक क्षेत्राच्या शेतकय्रांना सर्वात कमी कर्ज माफीचा लाभ मिळेल अशाच तरतुदी केल्या आहेत. परीणामी आज पर्यंत विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त कापुस उत्पादक शेतकय्रांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही कारण केंद्र सरकारने ८० टक्के शेतकय्रांना पिक कर्ज देणाय्रा सहकारी बँकांना एक दमडीही उपलब्ध करून दिली नाही याउलट नाबार्ड ने यावर्षी पिक कर्जाच्या पतपुरवठ्यामध्ये मागील वर्षीपेक्षा ५० टक्के रक्कम कमी केल्यामुळे कर्ज माफीचा लाभ मिळुन नविन पिक कर्ज शेतकय्रांना मिळणार नाही हे मात्र निश्चीत झाले आहे सहकारी बँकांसोबत सरकारी बँकांचा सुध्दा नाबार्डने पतपुरवठा रोखुन धरला असुन आम्ही विदर्भातील हवालदिल शेतकय्रांना कर्जमाफीचा फायदा देऊन नविन पिक कर्ज देण्यास असमर्थ असल्याची माहीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २७ जुनला मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत दिली आहे असा परिस्थीती ३० जुन पुर्वी कर्जमाफीचा फायदा देवुन नविन पिक कर्जाचे वाटप शेतकय्रांसाठी दिव्य स्वप्न ठरणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली. पंतप्रधानांनी जुलै २००६ मध्ये बँकांना १८४० कोटीची व्याजमाफी दिली होती व नाबार्ड मार्फत २५०० कोटी रूपये पिक कर्जाच्या वाटपासाठी उपलब्ध केले होते त्यावेळी सहकारी व सरकारी बँकांनी पश्चीम विदर्भातील १० लाख ८४ हजार शेतकय्रांना पतपुरवठा केला होता मात्र २००७ मध्ये नाबार्डने पैसा उपलब्ध करून न दिल्यामुळे व बँकांच्या वसुल्या गोठल्यामुळे फक्त ४लाख ३४ हजार शेतकय्रांना बँकांनी नविन पिक कर्ज दिले होते आता सरकारने कर्ज माफीची घोषणा केली आहे मात्र यानंतरही पश्चीम विदर्भातील २ लाख ३२ हजार शेतकरी नविन पिक कर्जाला पात्र होत असुन त्यांना नाबार्डच्या पतपुरवठ्याच्या लक्षा प्रमाणे जेमतेम ७०० कोटी रूपये उपलब्ध होणार असुन ही रक्कम कृषी संकट दुर झाल्यापासुन सर्वात कमी राहणार आहे ही वस्तुस्थीती सी ए जी आपल्या अहवालात दिली होती व शेतकय्रांना पिक कर्ज वाटक करण्यासाठी पत पुरवठा देण्यास बँका असमर्थ असुनही परिस्थीती अजुनही जुलै महिन्याच्या शेवटा पर्यंत सुधारणार नाही अशा परिस्थीतीत ९० टक्के शेतकरी आपली शेती पुन्हा सावकाराच्याच कर्जावर करतील हे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ पंतप्रधानाचे ३ हजार ७५० कोटीचे पँकेजचे तिन तेरा वाजल्यानंतर आता विदर्भात १६०० कोटीचे कर्ज माफीचे पँकेज सुध्दा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्यात जाणार असुन नैराश्यग्रस्त शेतकय्रांच्या आत्महत्येत दुर्दैवाने पुन्हा वाढ होण्याची भिती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

Saturday, June 21, 2008

शासनाने निसर्गसंकट घोषीत करून संकटग्रस्त शेतकय्रांना आर्थिक मदत द्यावी - किशोर तिवारी

पाऊस बेपत्ता , विदर्भात दुबार पेरणीचे संकट, २ शेतकय्रांच्या आत्महत्या
शासनाने निसर्गसंकट घोषीत करून संकटग्रस्त शेतकय्रांना आर्थिक मदत द्यावी - किशोर तिवारी
आशिष बडवे
नागपुर - २१ जुन २००८ विदर्भातुनच नाही तर संपुर्ण राज्यातुन पाऊस बेपत्ता झाला असुन कापुस उत्पादकांची पंढरी असलेल्या विदर्भावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कर्जाच्या ऒझ्याखाली दिवस काढणाय्रा शेतकय्रांनी वेध शाळेचा पावसाचा अंदाज लक्षात घेवुन कर्जाची उचल करून केलेली पेरणी पावसाअभावी वाया गेल्याे त्यांनी कर्जातुन मुक्तीसाठी पुन्हा आत्महत्येचा मार्ग नैराश्येपोटी स्विकारला असुन केळापुर विभागात दोन शेतकय्रांनी दुबारपेरणीच्या संकटामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दुबार पेरणीच्या संकटातुन शेतकरी आत्महत्येचे पेरणीच्या दिवसात सुरू झालेले सत्र थांबविण्यासाठी राज्य शासनाने निसर्गसंकट जाहीर करून संकटग्रस्त शेतकय्रांना तात्काळ आर्थिक मदत घोषीत करावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. विदर्भात यंदा लवकरच पावसाळ्याला सुरूवात होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. त्यानुसार यंदा केरळ मध्ये वेळे पुर्वीच मान्सुन दाखलही झाला. परंतु महाराष्ट्राकडे मान्सुन सरकत असतांना त्याचा जोर कमी होत गेला पुणे, मुंबई आणि कोकण वगळता विदर्भात कोठेही पेरणीयोग्य मोठा पाऊस कोसळला नाही. दरम्यान पावसाळी वातावरण पाहता पुणे येथील वेध शाळेने राज्यात भरपुर वृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार विदर्भात शेतकय्रांनी पेरण्या उरकल्या परंतु मृग नक्षत्र पुर्णपणे कोरडे गेल्याने विदर्भासह राज्यावर दुबार पेरणीचे संकट ऒढवले आहे. कर्ज काढुन पेरणी उरकल्याने व डोक्यावर असलेले शेत कर्ज आणि त्यात दुबार पेरणीचे संकट अशा परिस्थीतीत शेतकय्रांची मानसीक स्थिती बिघडू लागली आहे. या संकटाला सामोरे जाण्याची ताकद शेतकय्रांजवळ उरली नसल्याने शेतकय्रांनी कर्जमुक्तीसाठी आत्महत्येचा मार्ग अंगीकारला आहे त्यातुनच केळापुर विभागात दोन शेतकय्रांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली गारगोटी पोडावरील रामभाऊ भोमु आत्राम वय (३०) व गणीराम कुचा राठोड रा. वासरी ता. घाटंजी अशी त्यांची नावे आहेत. रामभाऊ भोमु आत्राम यांचे आज पांढरकवडा उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आहे. दुबार पेरणीच्या संकटामुळे आत्राम परिवार दुःखाच्या सागरात बुडाला आहे. या निसर्ग संकटातुन शेतकय्रांना वाचविण्यासाठी व संकटग्रस्त शेतकय्रांचे आत्महत्या सत्र नियंत्रीत करण्यासाठी शासनाने तात्काळ निसर्गसंकट जाहीर करून संकटग्रस्त शेतकय्रांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी कळकळीची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे ईमेल व्दारे निवेदन पाठविले आहे.

पाऊस बेपत्ता , विदर्भात दुबार पेरणीचे संकट, २ शेतकय्रांच्या आत्महत्या

Friday, June 20, 2008

Tuesday, June 17, 2008

"ब्लूमिंगटन-नॉर्मल मधील साठ बालगोपालांनी सादर केले अप्रतिम नाट्यरामायणम्"




सौ सिमा आठवले"ब्लूमिंगटन-नॉर्मल - "चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्" असे अत्यंत प्राचीन, पौराणिक रामचरित्र येथील छोट्या छोट्या दोस्तांनी सादर करून भल्याभल्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. अत्यंत थाटात, देखणेपणाने आणि परिश्रमपूर्वक पार पडलेले हे महानाट्य पाहून 'ब्लूमिंगटन सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस्' चे ६०० हून अधिक प्रेक्षकांनी गच्च भरलेले सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. मध्य-पश्चिम अमेरिकेतील ब्लूमिंगटन-नॉर्मल, इलिनॉय येथे सादर केलेले रामायणावरचे हे नाटक आणि कौन बनेगा रामायण एक्सपर्ट (के.बी.आर्.इ.) च्या स्पर्धा यासाठी गेले तीन महिने पद्धतशीर अथक प्रयत्न केले गेले. पाच ते पंधरा वर्षे वयोगटासाठी आकर्षक स्पर्धा तयार केल्या गेल्या. त्यासाठी आधी सर्व मुलांना रामायण रंजक पद्धतीने शिकविले गेले. नंतर चित्रकला, संगणकावरील ऑन-लाईन परिक्षा, गोष्टीरूप रामायण आणि रामायणातील नैतिक मूल्ये, वैशिष्ट्यपूर्ण आदर्श व्यक्तिरेखा यावर वक्तृत्व, अशा स्पर्धा झाल्या. रविवार दि.८ जून रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाची आखणी आणि संयोजन 'हिन्दू स्वयंसेवक संघा'ला साजेसे असे शिस्तबद्ध होते. 'एच. एस्. एस्.' चे स्वयंसेवक आणि त्यांना मदत करणारे अनेक हितचिंतक आणि साठ बालगोपाल यांच्या सहाय्याने हा कार्यक्रम अभूतपूर्व रितीने संपन्न झाला. 'हिंदू स्वयंसेवक संघाचे' उत्तर अमेरिका प्रचारक श्री. सौमित्रजी गोखले कार्यक्रमाला प्रमुख पहुणे म्हणून लाभले होते. श्री. श्रीनारायाण चांडक यांनी स्वागतपर भाषण केले. रामायणातील आदर्श मूल्यांमुळे आपण चांगले नेते होऊ शकतो, आपली सामाजिक जणीव प्रगल्भ होण्यास मदत होते असे आपल्या भाषणात त्यांनी सांगितले. हाजारो वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणाचे आजच्या जीवनात काय महत्व आहे ते अत्यंत सुंदर पद्धतीने सौमित्रजींनी सांगितले. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, जटायू, बिभिषण अशा अनेक व्यक्तिरेखांमधून आपण अनेक वेगवेगळे गुण घेऊ शकतो. राम चरित्र अनेक देशांत नृत्य, नाट्य, शिल्प रुपात सांगितले जाते. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, सैबेरिया आणि रशियातसुद्धा रामायणाचे गोडवे गायले जातात. या विषयावरचा दहा मिनिटांचा माहितीपट आधी दाखविला गेला. 'बाल गोकुलम्' हे लहान मुलांवर हिंदू संस्कार करणारे केंद्र ब्लूमिंग्टनमध्ये चालविले जाते. या विषयावरचा १० मिनिटांचा माहितीपटही येथे दाखविला गेला. प्रार्थना, श्लोक, पौराणिक कथा, भारतीय खेळ असे विविध विषय येथे शिकविले जातात. रामायण महानाट्यात 'बालकांड, विश्वामित्रांच्या आश्रमातील विद्याभ्यास, सीता स्वयंवर, राम वनवास, सीता अपहरण, लंका दहन, सेतू बंधन, राम-रावण युद्धातील अनेक प्रसंग, रामाचे आयोध्येत पुनरागमन आणि शेवटी पट्टाभिषेक असे विविध प्रसंग मुलांनी सादर केले. नेपथ्य, प्रकाशयोजना, दृक-श्राव्य पद्धतीचा वापर, सूत्रसंचालन इ. सर्व सुनियोजित होते. भाग घेतलेल्या सर्व मुलांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली. 'के.बी.आर्.इ.' या स्पर्धांची पारितोषिकेही टाळ्यांच्या गजरात प्रदान करण्यात आली. अशा तर्हेने पहिल्या प्रवेशापासून टाळ्यांच्या प्रतिसादाने उत्तरोत्तर रंगत गेलेला रामायणाचा हा महानाट्य प्रयोग श्रीरामांच्याच आशीर्वादाने सुफळ संपूर्ण जाहला. "बोलो - श्रीरामचंद्र की जय!!"

कर्ज वसुल करतांना ते वडिलांच्या धाकाने वसुल करावेत - अँड.शरद बनसोडे

कर्ज वसुल करतांना ते वडिलांच्या धाकाने वसुल करावेत - अँड.शरद बनसोडे
सोलापूर दि।१६ :– सर्वसामान्य माणासाच्या विकासासाठी त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून पतपुरवठा करणे गरजेचे आहे। मात्र पतसंस्थेने कर्ज देताना आईच्या ममतेने द्यावे व वसुल करताना वडिलांच्या धाकाने करावे असे मत सिनेअभिनेते अॅड। शरद बनसोडे यांनी व्यक्त केले। लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या २२ व्या वागदरी शाखेचे उद्‌घाटन अॅड।शरद बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले हे होते। व्यासपीठावर खासदार सुभाष देशमुख, माजी आमदार महादेव पाटील, जि।प।सदस्य आनंदराव तानवडे, पंचायत समितीचे सदस्य धोंडाप्पा यामानी, पंचायत समितीचे सदस्य मल्लिनाथ हत्ते, भाजपा अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीजचे सरव्यवस्थापक रविकांत पाटील, दूध डेअरीचे सरव्यवस्थापक रामचंद्र गवळी, शिवशरण कोटे, पंचप्पा कल्याणशेट्टी, वागदरीच्या सरपंच सिंधूताई सोनकवडे, पतसंस्थेचे चेअरमन सुरेश साठे, व्हा।चेअरमन संभाजीराव पाटील, यशवंत साठे आदीं मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक चेअरमन सुरेश साठे यांनी केले। यावेळी माजी जि।प।सदस्य पंचप्पा कल्याणशेट्टी , माजी आमदार महादेव पाटील यांनी विचार व्यक्त केले। पतसंस्थेचे संस्थापक खासदार सुभाष देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आता सरकार काही देईल याची वाट पाहत बसू नका। आपण आपला विकास करून घ्या। मिळविलेल्या चार पैशातून काही तरी बचत करा। गरिबीमुळे समाज व्यसनाकडे वळत आहे आणि व्यसनातून पुन्हा गरिबी निर्माण होत आहे। हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे। आता कुणाच्या तरी हाताकडे पाहण्यापेक्षा अनुदानाची वाट पाहण्यात वेळ घालविण्यापेक्षा तो वेळ शेतीसाठी द्या, व्यवसायासाठी द्या व स्वत:ची प्रगती करून घ्या असे त्यांनी सांगितले। मी अक्कलकोट तालुक्यात पतसंस्थेची शाखा काढतो आहे तेव्हा या मतदारसंघातून मला निवडणूक लढवायची आहे असे नाही। मी विकास कामे करताना कधीच मतदारसंघाचा विचार केला नाही। राजकीय व्यक्तींनी बारा महिने राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। अध्यक्षीय भाषणात आप्पासाहेब चौगुले यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेवून सर्वसामान्यसाठी काम करणारा नेता असे खासदार देशमुख यांचे वर्णन केले। कार्यक्रमास मल्लिनाथ शेळके, मल्लिनाथ हत्ते, शिवशरण वाले, शिवशरण जोजन, यशवंत धोगडे, विजयकुमार पाटील, प्रकाश कोमानी, प्रविण शहा, सचिन कल्याणशेट्टी, अतुल कोकाटे, संतोष मिरगे, डॉ।शेट्टेर, श्रीशैल नंदर्गी, मल्लिनाथ मसुती आदी पतसंस्थेचे सर्व संचालक व सल्लागार तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते। सुत्रसंचालन अनिल सर्जे यांनी केले। आभारप्रदर्शन संचालक मुरारी शिंदे यांनी केले।

लोकमंगल पतसंस्थेतर्फे ५०० बचत गटांना २ कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज

लोकमंगल पतसंस्थेतर्फे ५०० बचत गटांना २ कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज
सोलापूर दि।१६ राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशनने हमी घेतल्यास परतफेडीच्या तत्वावर लोकमंगल पतसंस्थेतर्फे बार्शी तालुक्यातील ५०० बचत गटांना २ कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज तात्काळ मंजूर केले जाईल¸ असे आश्वासन लोकमंगल उद्योगसमुहाचे संस्थापक खा।सुभाष देशमूख यांनी दिले। या महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम बनले पाहिजे आणि ज्या कामासाठी कर्ज घेणार आहे त्याच कामासाठी त्या कर्जाचा वापर करावा असे आवाहन खा।सुभाष देशमूख यांनी यावेळी केले। बार्शी सारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशन सारखा देशव्यापी महासंघ होत असुन त्या माध्यमातून बार्शी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे ¸अशा लोकसंग्रहयूक्त महासंघाच्या माध्यमातून महिला बचत गट व पुरूष बचत गटांच्या मानवी शक्तीचे योग्य नियमन करूण उत्पादन अथवा व्यवसाय करणार आहेत व जे बचत गट उत्पादने करण्यास इच्छूक नाहीत अशांना ट्रेडिंग एजन्सीचे काम देणार असल्याचे खा। सुभाष देशमूख यांनी सांगितले।यावेळी फेडरेशनच्या प्रस्तावावर खा। सुभाष देशमूख यांनी २ कोटी रूपयांचे कर्ज परतफेडीच्या तत्वावर मंजुर केले। या फेडरेशन तर्फे सुविधा सेवा केंद्राची सुरूवात केली असून शासकीय योजना २ महिन्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रत्येक गावामध्ये पोहोचविण्याचे आश्वासन फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालाक श्री।जीवनदत्त अरगडे यांनी सांगितले।यावेळी बार्शी तालुक्यातील १०० जणांचे शिष्टमंडळ खा। सुभाष देशमूख यांना भेटण्यास आले होते।

Saturday, June 7, 2008

मोनसान्टो बिटी काँटन भारतीय शेती करीता घातक



नागपुर - ७ जुन २००८

विदर्भ जनआंदोलन समितीच्या ग्रुप ने केलेले मेली बग वरील सर्वेक्षण धक्कादाक ठरले आहे. सर्व प्रकारची झाडे आणि शेती पिकांवर मिली बग झपाट्याने आक्रमण करीत आहे. एम. एन. सी. मोनसान्टो कंपनी निर्मीत बि.टी. काँटन बियाण्यांचीच मिली बग भेट असल्याचे दिसुन आले आहे. आणि येणाय्रा खरिप हंगामात याचा मिली बग शेत पिकांवर सर्वत्र दिसुन येईल असे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. हा विषाणु फक्त कापुस उत्पादकांकरीताच घातक नसुन सर्व कडधान्य व भाजी पिकांकरीताही तेवढाच घातक असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. त्याकारणाने तिवारी यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचेकडे एका शिपारशीतुन मोनसान्टो बियाण्यांवर प्रतिबंध आणण्याचा आग्रह केला आहे. विदर्भातील कापुस उत्पादक कर्ज संकटाला तोंड देत आहे. अशात कापुस बियाणे कृषी संकट वाढविणारे ठरावेत याकडेही किशोर तिवारी यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपल्या तक्रारीतुन केला आहे. अहवालावरून लंडन च्या विज्ञान संस्थेने केलेल्या अभ्यासात मोनसेन्टो भारताकरिता घातक असल्याचे म्हटले आहे. १३ मे २००८ मधील आपल्या लेखात बिटी काँटन बियाण्यांची घातकता स्पष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की जैविक बिटी काँटन बियाणे भारतात कापुस (सीस २७) आणि आंध्र प्रदेशात कापुस (सिस २९) या बियाण्यांच्या रोपांचा केलेल्या अभ्यासात मिली बग आढळुन आला आहे. याचे छायाचित्र घेण्यात आले आहे ही बियाणे वेगवगळ्या कंपन्यांमध्ये आहेत विदर्भात गंगा, कावेरी, ब्रम्हा, आणि बन्नी या सर्वांच्या प्लान्ट्सचे लेबल बोलगार्ड आहे. या प्लान्टमध्ये बिटी येण्यापुर्वी मिली बगचे विषाणु कुठेही नव्हते. तिवारी म्हणतात दोन वर्षापुवी चिन येथील काँटनचा अभ्यास केला तेथील अभ्यास प्लाँट चे छायाचित्र व चित्रीकरण पाहीले आणि आता म्हणता येईल की विदर्भातही मिली बगचा शिरकाव झाला आहे. आता जेव्हा कापसाचे पिक मरेल तेव्हा मिली बग इतर पिकांवर आक्रमण करेल. जुनच्या मध्यात शेतकरी नविन कापुस पीक घेण्याच्या तयारीत असतो परंतु त्या पुर्वी बग हा दुपटीने वाढलेला असेल. त्याने काँग्रेस जवळील तंबाखु आणि जवळपासचे बगीच्यांमध्ये तो पसरेल याच वेळी मी मृत रोपांचाही अभ्यास केला. काँटन सिडच्या नविन जनरेशन मध्ये हायब्रिड सिडस् सर्व पुरुष असल्याचे आढळले थोडक्यात ही बियाणे टरमिनेटर आहेत आणि १९९३ मध्ये वरिष्ठ सरकारी कमेटीने त्यांना प्रोव्हाइड केले आहे. या लेखा मागील उद्देश एवढाच की माझा शेतकय्रांना एवढाच सल्ला आहे की त्यांनी एफ २ बियाणे जसे हायब्रीड. त्यातुन रोपं तर उगवतात परंतु ते सर्व पुरूष प्रजातीचे असतात किशोर तिवारींनी यावरील विस्तृत माहिती पंतप्रधानांकडे पाठविली आहे.