Sunday, February 24, 2008

भिवरी गांव शेतकरी आत्महत्या मुक्त

शाश्वत कृती परिषदेचा दावा
अमरावती - ७ वर्षापुर्वी गठीत करण्यात आलेल्या शाश्वत कृषी कृती परिषदेने पारंपारिक शेती ला सुनियोजीत करून विदर्भात जवळपास ३ लाख शेतकय्रांशी आपले नाते जोडले आहे. त्याचप्रमाने दर्यापुर तहसिल मध्ये येणाय्रा भिवरी गांवाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा दावा केला आहे. या संघटनेचे विदर्भ प्रांतीय निमंत्रक संजय भगत ने सरकारकडे पारंपारिक शेतीवर लक्ष केंद्रीत करण्याची मागणी केली आहे. संजय भगत यांनी एक पत्रकार परिषद घेवुन त्यांनी पारंपारिक शेती विषयी माहिती देवुन सरकारला हा सल्ला दिला. पारंपारिक शेतीत रासायनिक औषधांऐवजी नैसर्गीक खत व किटकनाशक वापरल्या जाते असे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की शाश्वत कृषी कृती परिषदेच्या स्थापनेचा उद्देश शेतकय्रांचे जिवन बदलविणे हा आहे. भिवरी गावातील सर्वच शेतकरी या अभियानात सहभागी झाले आहेत.

No comments: